Wednesday, December 16, 2009

वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने

हल्ली वास्तुज्योतिष हा प्रकार फारच बोकाळला आहे. हा वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?
वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतो व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.
(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... वरुन उधृत)
सुप्रसिद्ध ज्योतिषी व. दा भट काय म्हणतात ते पहा.

Sunday, October 11, 2009

फलज्योतिष विद्येवर शोध किरण

फलज्योतिष - विद्येवर शोध किरण 

फलज्योतिष विद्येवर शोध किरण या पुस्तिकेच्या नावावरुन जर कुणाचा असा समज झाला असेल कि हे पुस्तक आपल्याला फलज्योतिष शिकण्यास उपयुक्त आहे तर तो गैरसमज आहे. या पुस्तिकेचा उद्देश हा मनोरंजन किंवा फलज्योतिष शिकवणे असा नसून सामान्य लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मनुष्याची बुद्धी मूलत: चिकित्सक असली तरी फलज्योतिषाच्या गूढ वलया भोवती लोप पावते.एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे म्हणुन आपणही विश्वास ठेवलेला बरा अशी जी मनोवृत्ती आहे त्याची लेखकाला खंत वाटते.नाडी या प्रकरणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण जे लोक देउ शकत नाहीत ते लोक एकनाड आहे तर संतती होणार नाही असे बिनधास्त ठोकून देतात.त्यामुळे चांगली अनुरुप असलेली स्थळे हातची
घालवावी लागतात या गोष्टी ची चीड येउन लेखकाने त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.

Friday, September 18, 2009

ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड


ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड
फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड हे नावच इतके स्वयंस्पष्ट आहे कि लेखकाला नेमक काय म्हणायच आहे हे यातुन स्पष्ट होत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर फलज्योतिष = लोकभ्रम + लबाडी+योगायोग+ इंट्युशन ग्रहतारे हे फक्त शोभेसाठी!
असे समीकरण मांडुन लेखकास काय सांगायच आहे याचे मुद्दे दिले आहेत. काही मुद्दे थोडक्यात असे आहेत.

Wednesday, July 29, 2009

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर वाचकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. यापुर्वी फलज्योतिषावर आपले मत काय? हा कौल घेतला होता. दैनिक सकाळ मध्ये ही यावर निवेदन दिले होते. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्याचे ही जागा नाही. धनंजयाचे स्टॅटिस्टिकल मॉडेल वर या अगोदर चाचणी झाली आहेच. त्याचे संदर्भ खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत


दुवा क्र १


दुवा क्र २

Wednesday, April 01, 2009

नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न

नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. त्याकाळात आम्हाला नाडीवाल्या लोकांना विचारायचे काही प्रश्न पडले होते आज ही आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात.

Friday, March 20, 2009

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार

विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार
अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`
( ढोलकी: खुद्द प्राचार्य गळतगे )



विंग-कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेले "बोध अंधश्रद्धेचा" या नावाचे पुस्तक आमच्या एका सनातनी मित्राने आमच्या हाती दिले व 'आता बोला!' अशा आविर्भावाने तो आमच्याकडे बघू लागला. पुस्तक वरवर चाळून पहाताच मित्राचा हेतू आमच्या ध्यानात आला. पुस्तक वाचतांना आम्हाला असे वाटले की 'बोध अंधश्रद्धेचा' या नावाऐवजी लाभ अंधश्रद्धेचा, किंवा लोभ अंधश्रद्धेचा हे नाव या पुस्तकाला जास्त शोभून दिसले असते!
नि:स्वार्थपणे जनहितार्थ झटणारे ते दैवीगुणाचे, आपल्याबरोबर इतरांचेही हित जपणारे ते मनुष्यगुणाचे, आपल्या स्वार्थाकरिता दुस याचे नुकसान करणारे ते राक्षसगुणाचे, पण निष्कारण दुस यांचे नुकसान करणा यांना काय म्हणावे हे भर्तृहरीला समजेना! 'ते के न जानीमहे |' एवढे म्हणून तो स्वस्थ बसला. त्याच्या वर्गवारीप्रमाणे समाजात भोळसट आणि वेडगळ समजुती फैलावण्यातच ज्यांचा स्वार्थ गुंतलेला असतो त्यांना आपण राक्षस-श्रेणीत घालू शकू पण केवळ सनसनाटीच्या आनंदासाठी घातक किंवा वेडगळ समजुती जे फैलावतात त्यांना कोणत्या श्रेणीत घालायचे ? (देवालाही वेठीला धरणारे हे लोक!) त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणावे तर तसेही नसते. तर, अशा या दोन श्रेणीच्या लोकांना अं. नि. स. हा त्यांच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असे वाटते म्हणून ते तिच्यावर सतत आग ओकत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा हेतू तोच आहे एवढे सांगितले म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपाची कल्पना वाचकांना येईल.

Monday, February 09, 2009

महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार

फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.

Saturday, January 03, 2009

परिसंवाद -लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?

पुणे- "सामान्य माणसांना लग्न जुळविण्यासाठी पत्रिकेचा आधार घ्यावासा वाटला तर त्यात काही गैर नाही" असे प्रतिपादन फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे प्रकाश घाटपांडे यांनी केले. विवाह ही अनिश्चित भविष्याशी संबंधित घटना असल्याने त्यात पडताना मानसिक आधाराची गरज ही प्रत्येकाला लागतेच, असे सांगुन ते म्हणाले,"परंतु आपण जेव्हा पत्रिकेचा आधार घेतो तेव्हा पत्रिका म्हणजे काय, तिच्यातील ढोबळ गणिते कशी मांडतात, मंगळ असतो म्हणजे काय, एकनाडीचा दोष मानावा कि मानू नये यासारख्या गोष्टी आपण स्वत: समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर त्यात तथ्य आहे असे वाटल्यास त्याचा जरुर आधार घ्यावा."
फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे आयोजित " लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?" या परिसंवादात स्वत:चे विचार मांडताना सुप्रसिद्ध वैद्यकिय विवाह समुपदेशक डॊ शांता साठे म्हणाल्या,"