Saturday, December 21, 2013

ज्योतिषाचे हमीपत्र?

17 डिसेंबर च्या महाराष्ट्र टाईम्स मधे वाचकांच्या पत्रात प्रा. य. ना. वालावलकर यांचे खालील पत्र छापुन आले आहे.
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’
प्रतिज्ञापुर्वक लिहून देतो, की फलज्योतिष हे भविष्य कथनाचे शास्त्र आहे.आम्ही वर्तवलेले भविष्य खोटे ठरले, तर ग्राहकाने दिलेली सर्व फी त्यांना सव्याज परत करु. ’ पृच्छकाने जन्मदाखल्याची सत्यप्रत द्यावी. त्यावर जन्मदिनांक, वेळ व जन्मस्थान या नोंदी असतात. त्यामुळे ज्योतिषाला कोणतीही सबब सांगता येणार नाही. खरे तर ’पैसे घेउन भविष्यकथन’ या सेवेचा अंतर्भाव ग्राहक संरक्षण कायद्यात व्हावा. म्हणजे हा फसवणुक प्रकार बंद होईल.
------------------------------------------------------------------------------------
वरील पत्रानुसार अशी गॅरंटी कुणी ही ज्योतिषी देणार नाही हे तर खरेच. जन्मदाखल्यावर वेळेची नोंद आत्ताशी कुठ काही ठिकाणी होउ लागली आहे. अर्थात तो मुद्दा वेगळा. पण आता समजा कुणी असे म्हटले की जर डॉक्टरांनी ही ऑपरेशनच्या वेळी पेशंट वा त्याच्या नातेवाईकांच्या सह्या का घ्यावात? तो ही डॉक्टरांच्या सोयीच्या मजकूरावर.आम्ही आमच्या जबाबदारीवर ऑपरेशन करीत आहोत. आम्हाला धोक्याची जाणीव आहे अशा आशयाचा तो मजकूर. डॉक्टरही पैसे घेउनच सेवा देतात. वैद्यक शास्त्र देखील उपचाराचे विज्ञान आहे. थोडक्यात काय तर ग्राहक संरक्षण कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही क्लुप्त्या लढवत असतो. ज्योतिषी म्हणजे काही ब्रह्मदेव नाही. ग्यारंटी द्यायला. एवढा युक्तिवाद देखील जातकांना पुरतो. काही ज्योतिषी असेही म्हणतील अशी ग्यारंटी जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याकडे येउच नका. गॅरंटी न देताही त्यांच्याकडे आपखुशीने येणार वर्ग मोठा आहे.
एखाद ऑपरेशन च्या वेळी डॉक्टर दिलासा देताना सांगतात कि तुम्ही काही काळजी करु नका. आता विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. अशा प्रकारची ऑपरेशन्स यशस्वी होण्याचे प्रमाण आता ९९ टक्के आहे.त्यांचे म्हणणे संख्याशास्त्रीय दृष्टया खरेच असते. फक्त तुम्ही त्या ९९ मधील एक आहात कि उरलेल्या एक मधील आहात हे ते सांगु शकत नाही. समजा तुम्ही उरलेल्या एक मधले असाल तर तुमच्या साठी ते अपयश मात्र शंभर टक्के असते. पण तरीही डॉक्टरांचे म्हणणे खरेच असते. या ठिकाणी ज्योतिषी मंडळी मात्र १०१ टक्क्यांची गॅरंटी देतात. वरचा १ टक्का स्वतःचा वाढवून देतात. रुग्ण कुटुंबियांना मात्र दिलासा मिळतो. शिवाय ऑपरेशनच्या यशापयशाची जबाबदारी त्याच्यावर नसते. या ठिकाणी डॉक्टर ने जर निष्काळजीपणा केला व तो सिद्ध झाला तर त्यावर कायदेशीर केस होउन शिक्षा होउ शकते.ज्योतिषी मात्र सुरक्षित राहतो.

4 comments:

Pradnya said...

aajvar amhi pan anek jyotishi try kele..pan kharach kunach bhavishy khara hot nahi. mansachya hatat kahi goshti rahat nahit ani tevha to nashibachya havalyakade valato. tyachveli jyotishachi aathvan hote...manus nashibapudhe hatbal hoto ani te janun ghenyasathi jevha jyotishakade jato tevha te lakho upay sangtat. ani te karunahi kadhi kadhi phayda hot nahi. jevha apan parat tyanchya kade vicharayla jato tevha te mhantat yog nighun gela. which is really disgusting thing. he kuthetari thambayala hava... jyotishani jar bhavishya khara jhala nahi tar paise parat dyave....

Unknown said...

नमस्कार,
आपला लेख आवडला. सुंदर लेखनशैली. असेच लिहित राहा. आपले लिखाण आपण मराठी कॉर्नरच्या सभासदांशी देखिल share करू शकता. मराठी कॉर्नरच्या वतिने हे आमंत्रण स्विकारावे.

- मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com/

Unknown said...

नमस्कार,
आपला लेख आवडला. सुंदर लेखनशैली. असेच लिहित राहा. आपले लिखाण आपण मराठी कॉर्नरच्या सभासदांशी देखिल share करू शकता. मराठी कॉर्नरच्या वतिने हे आमंत्रण स्विकारावे.

- मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com/

नितीन जोगळेकरNitin Joglekar said...

हे सर्व हमीपत्र वगरे ज्योतिषशास्त्र हे शास्त्र नाही ह्या चुकिच्या गृहीतकावर आधारलेले असावे किंवा ज्योतिष विषयावरच्या पुर्वग्रह दुषीत विचारांनी प्रेरीत आहे. ज्योतिष सल्ला हा इतर सल्लागार ( डॉक्टर्स, वकील किंवा चार्टड अकाउंटट इ. ) यांच्या सारखाच आहे. मानवी शरीर हे गुंतागंतीच असल तरी ते शास्त्रशुध्द शिकल्याच आणि अनुभवाच सर्टिफ़िकीट घेतलेले लोक जेव्हा सल्ला द्यायला सुरवात करतात त्यांच्याकडुन हमीपत्र घेण्याची कल्पना सुध्दा कुणी करणार नाही. माझ्या बाबतीत एका अस झालय की त्यांच्या चुकीच्या सल्याने मी नको असलेले एक ऑपरेशन केले आहे. मी समजतो ही माझी जबाबदारी होती. कारण मी सेकंड ऒपिनीयन घेतले नाही.

ज्योतिषांच्या बाबतीत सुध्दा महत्वाचा निर्णय घेताना हेच लागु पडते. जातकांनी महत्वाच्या निर्णयात सेकंड काय थर्ड ओपिनीयन घ्यावे. शेवटी तो निर्णय ज्याचा त्याचा असतो.