Wednesday, October 08, 2014

लोकसभा निवडणुकातील ज्योतिषांच्या भाकीताचे काय झालं?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत  वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.नंदकिशोर जकातदार यांनी  देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष ऐसी अक्षरे वरील लेखक श्री प्रभाकर नानावटी यांनी तयार करुन खाली दिलेले आहेत.


अंदाज/भाकितं निकाल  निष्कर्ष  
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही
  चूक
कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाहीभाजप 282  चूक  
काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाहीयुती 334+  चूक
भाजपला १५५ ते १६५ जागा282  चूक 
काँग्रेसला ११५ ते १२६ जागा44  चूक 
राष्ट्रवादीला ८ ते १० जागा6  चूक 
शिवसेनेला १० ते १२ जागा18  चूक 
समाजवादी पक्षाला १८ ते २२ जागा5  चूक 
बसपाला १६ ते १८ जागा0  चूक 
महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती
  चूक 
आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही
बरोबर   
वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल
  बरोबर   
वाराणसीत त्यांना 'आप'च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेलफरक 371784चूक 
एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही
बरोबर  
पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढतफरक 315769  चूक 
विश्वजित कदम यांची सरशी होणार
  चूक
मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील.सर्व जागा युतीला  चूक 
मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणारबारणे विजयी  चूक
शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत
  बरोबर
नितीन गडकरींना  केवळ पाच ते दहा हजार मतानी विजय मिळेलफरक 284828  चूक
येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार
  वाट पाहू या 
त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल
  वाट पाहू या 

भाकित 21 व 22 साठी वाट पहावी लागेल. परंतु उरलेल्या 20 भाकितांपैकी केवळ 4 भाकितं  बरोबर ठरल्या.

1 comment:

Vijay Shendge said...

मग लोकांनी भविष्यवर विश्वास ठेवावा की ठेवू नये.