Pages

Saturday, January 03, 2009

परिसंवाद -लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?

पुणे- "सामान्य माणसांना लग्न जुळविण्यासाठी पत्रिकेचा आधार घ्यावासा वाटला तर त्यात काही गैर नाही" असे प्रतिपादन फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे प्रकाश घाटपांडे यांनी केले. विवाह ही अनिश्चित भविष्याशी संबंधित घटना असल्याने त्यात पडताना मानसिक आधाराची गरज ही प्रत्येकाला लागतेच, असे सांगुन ते म्हणाले,"परंतु आपण जेव्हा पत्रिकेचा आधार घेतो तेव्हा पत्रिका म्हणजे काय, तिच्यातील ढोबळ गणिते कशी मांडतात, मंगळ असतो म्हणजे काय, एकनाडीचा दोष मानावा कि मानू नये यासारख्या गोष्टी आपण स्वत: समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर त्यात तथ्य आहे असे वाटल्यास त्याचा जरुर आधार घ्यावा."
फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे आयोजित " लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?" या परिसंवादात स्वत:चे विचार मांडताना सुप्रसिद्ध वैद्यकिय विवाह समुपदेशक डॊ शांता साठे म्हणाल्या,"