tag:blogger.com,1999:blog-20688685.post8657902181408680999..comments2024-03-03T11:05:34.182+05:30Comments on फलज्योतिष चिकित्सा मंडळ: कुंडली एका नरेंद्राचीPrakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-20688685.post-18981116637469107212021-07-25T14:26:25.047+05:302021-07-25T14:26:25.047+05:30अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना शिक्षणाचा बाजार, आरोग... अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना शिक्षणाचा बाजार, आरोग्याचा बाजार, राजकारणाचा बाजार, पत्रकारितेचा बाजार आणि इंटरनेटवरचे सगळे नको नको ते बाजार चालतात. पैशाशिवाय मंत्रांनी आजार किंवा अडचणी दूर होत असतील तर ते वाईट आहे का? त्यात कसला आलाय श्रद्धेचा बाजार ? उदाहरणार्थ रामरक्षेतील रामकवच घेऊया. 'शिरो मे राघवः पातु', या मंत्राचा जप केल्याने डोकेदुखी थांबते. मेंदूच्या दुर्धर आजारांचा त्रास कमी होतो. 'विश्वामित्र प्रियः श्रुती' या श्लोकाचा जप केल्याने कानाचे आजार दूर होतात. फक्त एकच गोष्ट आहे - मंत्र सिद्ध करण्यासाठी विशिष्ट जपसंख्येची आवश्यकता असते. दुसरे उदाहरण म्हणजे शनीचा जप केल्याने उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटतात. कामात मन लागत नसेल तर शुक्राचा जप करावा किंवा बुधाचा जप केल्याने संवाद कौशल्ये (Communication Skills) सुधारतात. हे सगळे विज्ञानवाद्यांना थोतांड आणि मुर्ख आणि बावळटपणा वाटतो.. त्यांनी अभ्यास करून अनुभव घ्यावा.मग बोलावे आणि पुन्हा देवधर्माला आणि ज्योतिषाला श्रद्धेचा बाजार म्हणू नये म्हणजे मिळवली.<br /><br /> वेगवेळ्या ग्रहांच्या वारी त्या त्या शक्तींचे कारक असलेल्या देवतांचे दर्शन घेण्याचा उद्देश हाच आहे की त्या ग्रहाने निदान भौतिक शुभफळे किंवा पैसे दिले नाहीत तरी त्या ग्रहांमुळे होणार्या वाईट घटना किंवा दर्शविल्या गेलेल्या वस्तू किंवा व्यक्तींनी निदान त्रास तरी देऊ नये. उदा. मंगळवारी गणपती दर्शन, शनिवारी मारुती दर्शन आणि सोमवारी शिवदर्शन घेणे प्रसिद्ध आहे. बराच वेळ काम करताना मानसिक वेदना होतात, अशावेळी जो ग्रह त्या वेदनेचा कारक आहे, त्याचा जप केल्याने वेदना दूर होतात. हे सर्व सांगणे म्हणजे श्रद्धेचा बाजार आहे का ? आणि यातला विरोधाभास म्हणजे हे लोक फक्त पैसे मिळाले तरच देवावर विश्वास ठेवणार.<br /><br />Anonymousnoreply@blogger.com