माझे मित्र पराग दिवेकर गुरुजी हे गेली अनेक वर्षे पौराहित्य करतात. विवाह सारख्या विधींमधे येणार्या व्यावहारिक अडचणी त्यांना चांगल्या परिचित आहेत. त्यांनी पारंपारिक धार्मिक विधिंना आधुनिक लग्नविधीपद्धतीत सामावून घेतले आहे.ज्ञानप्रबोधीनी देखील आता याच प्रकारचा मॉडिफाइड लग्नविधी करत आहे. गोरज मुहुर्त हा सायंकाळी सुर्यास्ताच्या आसपास असतो. गायी संध्याकाळी परत गोठ्याकडे येण्याची वेळ म्हणजे गोरज. आता गायी शहरात नसल्या तरी ती वेळ आधुनिक जीवन शैली ला अत्यंत सुसंगत आहे. पण हा मुहुर्त केवळ ब्राह्मणेतरांमधे विशेष वापरात आहे. खर तर तो सर्वांना सोयीचा आहे. शास्त्रात तो ब्राह्मणांनी वापरुच नये असे कुठे म्हटले नाही. पण केवळ लोकसमूहाची परंपरा म्ह्णून तो ब्राहमणात वापरत नाहीत. अलिकडे अनेक उच्चभ्रू ब्राह्मण समाजात तो वापरात येत आहे. विशेषत; लॉन्स मधे सायंकाळ ही लग्नाची खूप सोयीची वेळ असते. लग्न व रिसेप्शन एकत्र असे मोठे फंक्शन करण्याचा प्रघात पडू लागला आहे. पंचांगातील रेडिमेड मुहुर्त हे रेडिमेड कपड्यांसारखे असतात तर काढीव मुहुर्त हे टेलरमेड कपड्यांसारखे असतात. माझ्या यंदा कर्तव्य आहे या पुस्तकात याची सविस्तर चर्चा आहेच.
Sunday, March 26, 2017
Friday, March 25, 2016
मनोविकार तज्ञ व मनोविकारांचा मागोवा चे लेखक डॉ. श्रीकांत जोशी यांचे ई पत्र
Dear Prakash
First of all, let me thank you for the kind words you
said about this book which unfortunately did not get the attention it
deserved looking at the importance of this subject. It is still good to
know that there are people who have thought about it.
Secondly, let me apologise for replying in English. This is due to the fact, that I can not type in Marathi.
Your
efforts at throwing sunlight on to the subject of PhalJyotish are
commendable. It is unfortunate, that even today, millions depend on this
completely unscientific method to decide about their life.
Shraddha,
or its twin Andhashraddha are far too deeply embedded in our culture,
and many other cultures around the world. The persistence of such
completely irrational thoughts and practices even amongst people who are
otherwise rational and practical in other areas of life, means that
these irrational thoughts serve some functions. Amongst the many
challenges of life, a challenge to live with uncertainty is a major one
for many people.
Future course of events are predictable
grossly in macro events, in the sense what will happen to environment
etc, it is nearly impossible to accurately predict what will happen in
any person's life.Though by far and large, most people's lives are
routine and nothing new happens most of the times, there are some
unexpected events. The other issue is while making an important life
changing decision like choosing a life partner or accepting a job offer,
most people want to peep into the future, they want to have as many
factors as possible which will in their opinion help them to make a
decision which provides best outcome for them.
Jyotish offers
future predictions, based on a process which appears very scientific,
like the position of stars and a deep study etc. People fall for such
pseudo scientific mumbo jumbo, as they want to be convinced that they
have an advance warning.
An emotional need to make future
predictable and secure leads people to irrational thoughts and beliefs.
When emotions are involved, rationality takes a backseat. It becomes
nearly impossible to convince such people and argue with them.
Urbanization,
modernization, globalization, splitting of family into smaller units,
are some factors which may loosen the grip of such irrational beliefs on
the common man. But even in that the success of many modern Gurus show
that people do have dependency needs which need fulfillment.
A
lot can be said about this, but I was happy to read your comments, and
feel free to translate my opinions about the same on your sites and
facebook if you feel so.
Warm Regards
Shreekant JoshiTuesday, March 22, 2016
औषध उतारे आणि आशीर्वाद
मंत्रतंत्र बाबा बुवा ज्योतिष च्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."
Tuesday, February 23, 2016
मुहूर्त
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती.
Saturday, August 15, 2015
ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा
जेष्ठ ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा म्हणतात,"ज्योतिषाच्या संदर्भात अगदी काही मोजक्या व्यक्तिंचे या शास्त्राच्या प्रचीतीबद्दलचे व हे मुळात शास्त्रच आहे का? याबद्दलची शंका असते. परंतु मी अनेकवेळा विविध ठिकाणी सांगत आलो आहे ज्यांचा ज्योतिषावर विश्वास नाही त्यांना हे शास्त्र बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करु नका. अट्टाहास करु नका."
संदर्भ- ग्रहांकित ऑगस्ट २०१५
अगदी खरं आहे. पण हेच उलट बाजूने ही म्हणता येईल. बहुतांशी लोकांचे या शास्त्राबाबत शंका नसते.काहींची तर ठाम श्रद्धा असते. चुकला तर ज्योतिषी चुकू शकतो पण ज्योतिष शास्त्र नेहमीच बरोबर असते.ज्यांचा अढळ विश्वास आहे त्यांना हे शास्त्र थोतांड आहे सांगण्याचा अट्टाहास करु नका.
संदर्भ- ग्रहांकित ऑगस्ट २०१५
अगदी खरं आहे. पण हेच उलट बाजूने ही म्हणता येईल. बहुतांशी लोकांचे या शास्त्राबाबत शंका नसते.काहींची तर ठाम श्रद्धा असते. चुकला तर ज्योतिषी चुकू शकतो पण ज्योतिष शास्त्र नेहमीच बरोबर असते.ज्यांचा अढळ विश्वास आहे त्यांना हे शास्त्र थोतांड आहे सांगण्याचा अट्टाहास करु नका.
Friday, January 02, 2015
आत्मानंद यांचे फलज्योतिषाला आव्हान!
फलज्योतिषाला आव्हान म्हटले की लोकांना डोळ्यासमोर अंनिस दिसते. पण अमृततुषार या आत्मानंद यांनी १९६७ साली लिहिलेल्या पुस्तकात फलज्योतिष हे शास्त्र आहे का? या प्रकरणात त्यांनी फलज्योतिषाला एक आव्हान दिले होते. ते म्हणतात," ह्या लेखातील विधानांस या शास्त्राच्या अभिमान्यांनी सविस्तर उत्तर तर द्यावेच परंतु त्या्च्या अगोदर त्या सर्वांना माझे असे आव्हान आहे की मी एक तंतोतंत अंशात्मक अशी कुंडली
Thursday, January 01, 2015
आत्मानंद यांची ज्योतिषविषयक काही मते
आत्मानंद हे अध्यात्मिक क्षेत्रात गति असणारे गृहस्थ. त्यांचे खरे नांव गणपत हिरालाल भावसार ( B.A, LLB ) जन्म:१९०० मृत्यू: १९७९ त्यांची अमृततुषार, अज्ञाताचा शोध व बोध, वैतरणेच्या ऐलतीरी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमृततुषार मधे त्यांचे फलज्योतिष हे शास्त्र आहे काय? व नाडीग्रंथावरील अभिप्राय ही दोन प्रकरणे फलज्योतिष व नाडीग्रंथावर टीका व आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहेत. ती मूळातूनच वाचण्यासारखी आहेत. इतर गूढ विषयावरील त्यांची काही मते विज्ञानवादी लोकांना मान्य होणार नाहीत. त्यांच्या अज्ञाताचा शोध व बोध या पुस्तकात भविष्यकालीन घटना व त्याचे ज्ञान. नावाचे एक प्रकरण आहे. त्यात ते म्हणतात.
"..यापैकी ज्योतिषासंबंधी सांगायचे म्हटले तर ते शास्त्र खोटे आहे असे म्हणण्यापेक्षा
"..यापैकी ज्योतिषासंबंधी सांगायचे म्हटले तर ते शास्त्र खोटे आहे असे म्हणण्यापेक्षा
Wednesday, November 26, 2014
स्मृती इराणी व ज्योतिष
मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी परवा आपल्या कुटुंबासोबत राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्या कडे ज्योतिष पहायला गेल्या व वाहिन्यांना सनसनाटी न्यूज मिळाली. तीन मराठी चॅनेलवर एकाच वेळी परिसंवाद चालू झाले.जणु काही त्या ज्योतिषाकडे गेल्यामुळे फलज्योतिषाला विज्ञानजगात मान्यताच मिळणार होती. पण
Wednesday, October 08, 2014
लोकसभा निवडणुकातील ज्योतिषांच्या भाकीताचे काय झालं?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष ऐसी अक्षरे वरील लेखक श्री प्रभाकर नानावटी यांनी तयार करुन खाली दिलेले आहेत.
Saturday, March 01, 2014
दाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य
ज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती पहा.कुठलीही राजकीय घटना या व्याप्तीत सहज बसवता येईल.
========================================================================
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.
Thursday, February 27, 2014
आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका!
आता २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.ज्योतिषांच्या भाकितांचे आता प्रमाण वाढू लागेल.उमेदवार आता ज्योतिषांचे सल्ले घ्यायला लागतील. मेदिनीय ज्योतिषाच्या आधारे ही राजकीय/निवडणुकीची भाकिते वर्तवली जातात.मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१)
Monday, February 03, 2014
भविष्य कुठल्या कारणामुळे चुकते??
वर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर
मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्धास्थान' असलेल्या आदिनाथ साळवी सरांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. जाहिरातीत भाकित खरे ठरल्याचा एखाद्या व्यक्तिचा अनुभव असतो. जर विवाह होणार असेल तर कुठे? कधी?कोणाशी? जोडीदाराचा स्वभाव कसा असेल? तो नोकरी का व्यवसाय करत असेल? त्याचे रंग रुप व्यक्तिमत्व आर्थिक परिस्थिती कशी असेल? विवाह नात्यात होईल का? प्रेमविवाह, पळून जाउन कि ठरवून? तो जातीचा असेल की परजातीचा? विवाहास जास्त खर्च तर येणार नाही ना? तो बिजवर व्यसनी नंपुसक, लफंगा तर नसेल ना? तो दीर्घायु आरोग्यसंपन्न आहे का? घरातील माणसांशी पटेल ना? ग्रहदोष दूर होउन वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अत्यावश्यक धार्मिक उपाय, उपासना व प्रार्थना कोणती करावी? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात. ते जाहीरातीत लिहिले असतात. जाहिरातीत हल्ली पुढे असेही लिहिले असते कि खालील कारणाने सांगितलेले भविष्य चुकीचे ठरु शकते
Monday, January 13, 2014
लपे करमाची रेखा
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खर्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सांगे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
कवियत्री – बहिणाबाई चौधरी
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खर्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सांगे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
कवियत्री – बहिणाबाई चौधरी
Thursday, January 09, 2014
ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन
'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,'' असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी पुणे येथ व्यक्त केले.
या निमित्ताने मला
Saturday, December 21, 2013
ज्योतिषाचे हमीपत्र?
17 डिसेंबर च्या महाराष्ट्र टाईम्स मधे वाचकांच्या पत्रात प्रा. य. ना. वालावलकर यांचे खालील पत्र छापुन आले आहे.
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’
Thursday, October 24, 2013
ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत हे पुस्तकच प्रकाशझोतात आल ते श्रीराम लागूंच्या भाषणामुळे. लोकवाङमय गृह व लोकविज्ञान चळवळ यांचे तर्फे आयोजित या पुस्तकाच्या प्रकाशनात डॉ लागू म्हणाले," ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे. ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन निषेधार्ह नाहीत तर त्या व्यक्तिला,समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करतात. त्याची सारासार विचारशक्ती मारतात.त्यामुळे वरकरणी कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा ही समाजाला घातक ठरते."
पुस्तकाची प्रस्तावना ही 'पुरस्कार' म्हणुन ग.वा.बेहेरे यांनी लिहिली आहे,त्यात त्यांनी स्वत:चे अनुभव मांडलेत.राशीभविष्य लिहायला कोणतीही अक्कल लागत नाही. मी सुद्धा काही काळ ते लिहिले आहे असे ते म्हणतात.
पुस्तकाच्या स्वरुपात विशाल नावाचा एक मुलगा आपल्या काकांना जिज्ञासेने प्रश्न विचारतो व त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे काका हे त्याच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देतात. विशालच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळून जातात.पुस्तकाच अस स्वरुप हे जाणीव प्रुर्वक असाव. कारण किशोरवयीन जिज्ञासा या वेळीच जाणुन त्यांना जर वैज्ञानिक दृष्टीकोनाची दिशा दाखवली तर होणारी युवापिढी ही विज्ञाननिष्ठ होईल.विशालच्या प्रश्नातून खगोलशास्त्राची सुरवात,पंचांगातील खगोलशास्त्र,खगोलशास्त्रात फलज्योतिषाची सरमिसळ, माणसाच्या दुबळेपणाचे फायदा घेणारे ज्योतिष,ग्रहण व अंधश्रद्धा असे विषय मांडले आहेत. याव्यतिरिक्त बुवांचे चमत्कार व त्यामागील विज्ञान व उपसंहारात अंधश्रद्धा व विज्ञान विषयक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. परिशिष्ट मधे गाडगे बाबा ते प्रबोधकार ठाकरे यातील दैववादाचा फैलावा. म.फुले समग्र वाङमय मधील 'आकाशातील ग्रह', आगरकरांच्या सुधारक मधील 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', महादेवशास्त्री जोशी यांच्या 'आत्मपुराण' मधील संदर्भोचित वेचे घेतले आहेत.
लेखक- जगदीश काबरे
प्रकाशक- सुकुमार दामले, लोकवाङमय गृह,८५ सयानी रोड भुपेश गुप्ता भवन प्रभादेवी मुंबई २५
पृष्ठे-७३
मूल्य- पंधरा रुपये.
पुस्तकाची प्रस्तावना ही 'पुरस्कार' म्हणुन ग.वा.बेहेरे यांनी लिहिली आहे,त्यात त्यांनी स्वत:चे अनुभव मांडलेत.राशीभविष्य लिहायला कोणतीही अक्कल लागत नाही. मी सुद्धा काही काळ ते लिहिले आहे असे ते म्हणतात.
पुस्तकाच्या स्वरुपात विशाल नावाचा एक मुलगा आपल्या काकांना जिज्ञासेने प्रश्न विचारतो व त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे काका हे त्याच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देतात. विशालच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळून जातात.पुस्तकाच अस स्वरुप हे जाणीव प्रुर्वक असाव. कारण किशोरवयीन जिज्ञासा या वेळीच जाणुन त्यांना जर वैज्ञानिक दृष्टीकोनाची दिशा दाखवली तर होणारी युवापिढी ही विज्ञाननिष्ठ होईल.विशालच्या प्रश्नातून खगोलशास्त्राची सुरवात,पंचांगातील खगोलशास्त्र,खगोलशास्त्रात फलज्योतिषाची सरमिसळ, माणसाच्या दुबळेपणाचे फायदा घेणारे ज्योतिष,ग्रहण व अंधश्रद्धा असे विषय मांडले आहेत. याव्यतिरिक्त बुवांचे चमत्कार व त्यामागील विज्ञान व उपसंहारात अंधश्रद्धा व विज्ञान विषयक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. परिशिष्ट मधे गाडगे बाबा ते प्रबोधकार ठाकरे यातील दैववादाचा फैलावा. म.फुले समग्र वाङमय मधील 'आकाशातील ग्रह', आगरकरांच्या सुधारक मधील 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', महादेवशास्त्री जोशी यांच्या 'आत्मपुराण' मधील संदर्भोचित वेचे घेतले आहेत.
लेखक- जगदीश काबरे
प्रकाशक- सुकुमार दामले, लोकवाङमय गृह,८५ सयानी रोड भुपेश गुप्ता भवन प्रभादेवी मुंबई २५
पृष्ठे-७३
मूल्य- पंधरा रुपये.
Monday, October 21, 2013
फलज्योतिष चिकित्सा
फलज्योतिष चिकित्सा : लेखक रा.ज.गोखले.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून निश्चित ज्ञान बहुतेके बाबीत मिळत नसेल व त्याचा तादृश उपयोग नसेल तर तसे जाहीर झाल्याने गरीब लोकांचा या शास्त्राचा सल्ला घेण्यात होणारा द्रव्याचा व कालाचा अपव्यय वाचेल व जनतेची दिशाभूल होणे टळेल.भविष्य ज्ञेय पण अटळ असेल,तर त्याचा खासगी व्यवहारात काही उपयोग नाही; पण ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या कामी उपयोग झाल्यास ऐतिहासिक ज्ञानवृद्धी च्या कामी या शास्त्राचा उपयोग करुन घेता येईल." फलज्योतिषाच्या मूलतत्वास निश्चित आधार मिळतो काय? शास्त्रात मानल्या गेलेल्या कारणांचा अपुरेपणा, भिन्न व परस्परविरोधी असलेले ज्योतिषातील पंथ, ग्रहयोग सूचक आहेत की कारक याबद्दलचा विचार,होय किंवा नाही हे उत्तर ग्रहहोगावरुन निश्चितपणे मिळणे शक्य आहे काय? शास्त्रातील मतभेद व संदिग्धता यामुळे वारंवार होणार्या घोटाळ्यांची उदाहरणे अशा अनेक पातळ्यांवर छोटी मोठी प्रकरणे पुस्तकात घेतली आहेत.बर्याच वेळा लोकमान्य टिळकांच्या कुंडली वर केलेली भाष्य उदाहरणात घेतली आहेत.फलज्योतिषाची आजची स्थिती ( म्हणजे १९३५ सालातील) मांडताना पुरस्कर्ते व विरोधी यांचे भिन्न पक्ष लेखकाने मांडले आहेत.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून निश्चित ज्ञान बहुतेके बाबीत मिळत नसेल व त्याचा तादृश उपयोग नसेल तर तसे जाहीर झाल्याने गरीब लोकांचा या शास्त्राचा सल्ला घेण्यात होणारा द्रव्याचा व कालाचा अपव्यय वाचेल व जनतेची दिशाभूल होणे टळेल.भविष्य ज्ञेय पण अटळ असेल,तर त्याचा खासगी व्यवहारात काही उपयोग नाही; पण ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या कामी उपयोग झाल्यास ऐतिहासिक ज्ञानवृद्धी च्या कामी या शास्त्राचा उपयोग करुन घेता येईल." फलज्योतिषाच्या मूलतत्वास निश्चित आधार मिळतो काय? शास्त्रात मानल्या गेलेल्या कारणांचा अपुरेपणा, भिन्न व परस्परविरोधी असलेले ज्योतिषातील पंथ, ग्रहयोग सूचक आहेत की कारक याबद्दलचा विचार,होय किंवा नाही हे उत्तर ग्रहहोगावरुन निश्चितपणे मिळणे शक्य आहे काय? शास्त्रातील मतभेद व संदिग्धता यामुळे वारंवार होणार्या घोटाळ्यांची उदाहरणे अशा अनेक पातळ्यांवर छोटी मोठी प्रकरणे पुस्तकात घेतली आहेत.बर्याच वेळा लोकमान्य टिळकांच्या कुंडली वर केलेली भाष्य उदाहरणात घेतली आहेत.फलज्योतिषाची आजची स्थिती ( म्हणजे १९३५ सालातील) मांडताना पुरस्कर्ते व विरोधी यांचे भिन्न पक्ष लेखकाने मांडले आहेत.
Thursday, October 10, 2013
फलज्योतिष एक महाथोतांड
फलज्योतिष एक महाथोतांड
पुस्तकाच्या नावावरुनच फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम, जन्मकुंडली हा जन्मक्षणीचा नकाशा मांडता्ना असलेली पृथ्वी हा भगोलाचा मध्य ही संकल्पना या गोष्टी खगोलशास्त्रीय दृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे मांडले आहे. अवकहडा चक्र ही ग्रीकांची अब्रॆका बाब्रा ची उसनवारी असून त्यात चातुर्वण घुसवण्याचे उद्योग कुणाचे? असा प्रश्न लेखक विचारतो.भारतीय पंचांग कशी चुकीची आहेत व त्यामुळे पडणार्या सायन निरयन कुंडली विषयी विवेचन त्यात आहे. फलित अथवा भविष्यकथन या प्रकारातील अपरिहार्य भाग म्हणजे राशीस्वभाव,ग्रहांच्या उच्च नीच राशी,कुंडलीतील भाव व स्थाने,ग्रहांच्या जाती,मंगळाचे खूळ,शनीची साडेसाती या विषयी थोडक्यात विवेचन मांडले आहे. त्यानंतर कोसळलेली भाकिते-दुटप्पी भाषा, राष्ट्राची कुंडली, फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास या मुद्यांनी पुस्तकाचा शेवट केला आहे.
एकंदरीत पुस्तकात फलज्योतिष हे केवळ थोतांड नसून महाथोतांड आहे हे आव्हानात्मक भाषा वापरुन सांगितले आहे. वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व डॊ सुरेंद्र बारलिंगे याचा अभिप्राय पुस्तकाच्या स्रुरवातीला आहे.
लेखक-सुधाकर भालेराव.
प्रकाशक
महाराष्ट्र रॆशनॆलिस्ट असोसिएशन
२४७ रमा नारायण निवास, तेलंग रोड माटुंगा मुंबई १९
प्रथम प्रकाशन- ४ मे १९८४
मूल्य- तीन रुपये
पृष्ठे -२२
पुस्तकाच्या नावावरुनच फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम, जन्मकुंडली हा जन्मक्षणीचा नकाशा मांडता्ना असलेली पृथ्वी हा भगोलाचा मध्य ही संकल्पना या गोष्टी खगोलशास्त्रीय दृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे मांडले आहे. अवकहडा चक्र ही ग्रीकांची अब्रॆका बाब्रा ची उसनवारी असून त्यात चातुर्वण घुसवण्याचे उद्योग कुणाचे? असा प्रश्न लेखक विचारतो.भारतीय पंचांग कशी चुकीची आहेत व त्यामुळे पडणार्या सायन निरयन कुंडली विषयी विवेचन त्यात आहे. फलित अथवा भविष्यकथन या प्रकारातील अपरिहार्य भाग म्हणजे राशीस्वभाव,ग्रहांच्या उच्च नीच राशी,कुंडलीतील भाव व स्थाने,ग्रहांच्या जाती,मंगळाचे खूळ,शनीची साडेसाती या विषयी थोडक्यात विवेचन मांडले आहे. त्यानंतर कोसळलेली भाकिते-दुटप्पी भाषा, राष्ट्राची कुंडली, फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास या मुद्यांनी पुस्तकाचा शेवट केला आहे.
एकंदरीत पुस्तकात फलज्योतिष हे केवळ थोतांड नसून महाथोतांड आहे हे आव्हानात्मक भाषा वापरुन सांगितले आहे. वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व डॊ सुरेंद्र बारलिंगे याचा अभिप्राय पुस्तकाच्या स्रुरवातीला आहे.
लेखक-सुधाकर भालेराव.
प्रकाशक
महाराष्ट्र रॆशनॆलिस्ट असोसिएशन
२४७ रमा नारायण निवास, तेलंग रोड माटुंगा मुंबई १९
प्रथम प्रकाशन- ४ मे १९८४
मूल्य- तीन रुपये
पृष्ठे -२२
Monday, October 07, 2013
पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष?
पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-
Wednesday, September 25, 2013
कुंडली एका नरेंद्राची
फेब्रुवारी २०१२ मधे मला डॊ दाभोलकरांचा फोन आला.
"दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
"ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
२००८ मधे झालेल्या अंनिसच्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पात मी समन्वयक होतो.त्यावेळी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या सर्व कुंडल्या मी तयार केल्या होत्या. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की तुमची कुंडली एकदा ज्योतिषांना अभ्यासाला दिली पाहिजे.सध्या ज्योतिषांच्या कुंडलीत दाभोलकर नावाचा ग्रह वक्री दिसतोय.ते नेहमी प्रमाणे निरागस हसले.
नोव्हेंबर १९९५ साली सातारा येथे आखिल भारतीय ज्योतिषांचे संमेलन झाले होते.त्यावेळी ज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका अंनिस ने घेतली होती. कृष्णराव वाईकर हे संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांना हाताशी धरुन हा धर्मावर घाला आहे अशी भूमिका घेतली होती.ज्योतिष हे धर्माचे अंग आहे. ज्योतिषाला आव्हान म्हणजे धर्माला आव्हान अशी मांडणी करुन अंनिसला दमात घेण्याचा प्रयत्न केला होता.अंनिस च्या कार्यकर्त्यांनी आपल्या बायकोचे कूंकु पुसुन यावे अशा आशयाची भाषा वापरली. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स ने त्याची दखल घेउन कुंकवाची उठाठेव असा अग्रलेख लिहिला होता.अंनिसने या धमक्यांना भीक न घालता त्याही वेळी कुंडल्या जाळण्याचा कार्यक्रम केला होता. अशा कार्यक्रमात ओम, गणपतीची प्रतिमा अशा हिंदुत्वाच्या प्रतिकांचे दहन होणार नाही याची काळजी घेतली.कारण उगीचच भावना दुखावल्याचे
भांडवल व्हायला नको.कुंडली हा आराखडा आहे. तो जाळून काय होणार आहे? लोकांच्या ज्योतिषावरील विश्वासाला त्यामुळे थोडाच तडा जाणार आहे? अशा आमच्यासारख्या काही लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणत अहो हे शेवटी प्रतिकात्मक असत.
आज दाभोलकर आपल्यात नाहीत.दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी दाभोलकरांचा २० ऒगस्ट २०१३ रोजी सकाळी सात सव्वासात च्या दरम्यान क्रूरपणे खून केला.भाडोत्री खूनी कदाचित सापडतीलही पण त्यामागच्या मास्टर माईंडचे काय? दाभोलकरांवर प्रेम करणारे अनेक ज्योतिष भाविक देखील आहेत.अनेक ज्योतिषी त्यांच्या कुंडलीवरुन आता ग्रहयोग खून दर्शवत होते असे सांगत फिरतील. कुंडलीतील शनि मंगळ युती कशी घातक ठरली हे सांगतील.जन्मवेळ व मृत्युची वेळ ही जवळपास एकच कशी होती हे सांगतील.त्यावेळी मंगळ कर्केत प्रवेश करीत होता हे सांगतील.पण त्यांनी आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरुन सांगाव हे त्यांना अगोदर सांगता आल असत काय?
Subscribe to:
Posts (Atom)

